चारोळी

तुझ्यासाठी रोजच मी
चारोळी लिह्ण्याचं ठरवतो
पण तुझी आठवण येते
आणि हातच लिहायचा थांबतो.
पाण गळताना झाडाला
दुःख होत असेल का?
मला सोडुन गेल्यावर
तुला झालं होत का?
तुझ्या अश्रुंच्या धारेन
माझ्या मनाचं अंगण पार ओळं केलस
जवळ येवुन चिंब भिजवलस
आणि दुर जावुन कोरडं केलस
भोवताली अनेक जण मला
त्रासलेले दिसतात
जीवनात येणारं अपयश पचवत
जनू ती जगत असतात
मी ही आता स्वतःचं
अस्तित्व निर्माण करतोय
दुसर्यांच्या मदतिच्या कुबड्यां पासून
स्वतःला वेगळं करतोय
अशा ह्री मानसाला
अंधारातील किरण भासते
आशा बाळगूनच ह्र्दय
लाख जख्मा ही सहन करते-
डोळ्यात अश्रू दाटले कि
मी लगेच एकांत शोधतो
भरुन आलेल्या आभाळाला
मनसोक्त बरसु देतो
माझ्या घराला मी
कधीच कुलुप लावित नाही
घर तर दुःखानेच भरलय
आणि दुःख कोणचं चोरत नाही
नाटकात मला रडताना पाहून
लोकांनी माझा नटसम्राट केला
हसण्याची जेव्हा वेळ आली
माझ्यातला कलाकारच मेला
मी ज्या वाटेवरुन चालतोय
त्यावर काटेच पेरले आहेत
माझ्या वाटेवर काटे पेरुन
माझे आपलेच गेले आहेत
अंधाराचा मला त्रास होत नाही
उजेडच मला सतवितो
अंधारात दडलेलो मी
उजेडात मात्र उघडा पडतो
शेवटच्या क्षणी मेणबत्ती
जास्तच त्वेषाणे पेटली
दुसर्यांसाठी शेवटपर्यंत जळायचं
हेच सांगत ती विझली
नात्याचं बंधन नाजूक असतं
त्यावर विश्वासाचं पांघरून घातलं पाहीजे
परिस्थिती कितीही वाईट असली
तरी विश्वास कायम राहीला पाहीजे
ह्रदयावरील जख्मा ही भरल्या जातात
काही काळ जाऊ द्यावा लागतो
दुःखा नंतर सुख ही येतं
थोडा धीर धरावा लागतो
सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी
मी वणवा होऊन पेटलो
काही काळ अंधार दूर झाला ही
मी मात्र कायमचा विझलो
शब्द अनमोल आहेत
ती जपून वापरायची असतात
फ़ळ्यावरील पुसता येतात
मनातील मात्र कायम राहतात
जग सोडून जाण्याचा
नेहमी विचार करतो
तुमची आठवण येते
आणि मी पुन्हा मागे फ़िरतो
विनायक बोभाटे १४३
No comments:
Post a Comment