Wednesday, 31 October 2007

तुझ्यासाठी ......................


तुझ्यासाठी आयुष्याच्या वाटेवर चालत होतो जेंव्हा तेंव्हा ओळख होत गेली
भेटी होत गेल्या तेंव्हा तेंव्हा
परत भेटू आपण म्हणून वचने दिली
पण वेळ आली न कधी ........
दिवस गेले ..... रात्री गेल्या
तय वेळेने घाव घातले जीवावरी.......
गुन्हा हाच होता माझा
खरी प्रित तुज्यावारी
प्रित तुझ्या लक्षात राहिल का ?
त्या आश्रुच्या आशेवर
जीव हा वाट पाहत राहिल का ?
मनी ह्र्दयी तुझी प्रतिमा पूजत राहिल
पूजत राहिल

Tuesday, 31 July 2007

त्यादिवशी


कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..

त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलाण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली

शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली

Saturday, 14 July 2007

तिला कळतच नाही


तिला कळतच नाही
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

Wednesday, 4 July 2007

चाहत


कांटे नसीब मे है
फूलोकी चाह मत कर
ये मेरे दिल वही गुनाह मत कर
जो कुछ भी दिया उसने हस्कर कबूल कर
आसू कीमती है खुशियो कि चाह मत कर
खुशबु भरा ये चमन किसी ओर के लिए है
जान बूझकर यहा दिल आपना तबाह मत कर

आस.................


आस.................

दूर दूर तुझ्यापसुन जाईन
अंतिम इच्छा एकशिल का ?
नजर फिरव पण .............त्यापुर्वी
एकच कटाक्ष टाकशिल का?
तोंड फिरव पण .............. त्यानंतर
एकदा स्वप्नी येशिल का ?
भेटू नकोस पण............... त्यानंतर
एकदा हास्य करशील का ?
मला विसर पण ..........एक सांगतो
माझी आठवण काड्शील का ?

Tuesday, 3 July 2007

विनायक


कोन किसके करीब होता है
आपना आपना नसीब होता है
याद आता है अझिज कोई
तो दर्द दिल के करीब होता है
------------------------

नाजुक कोमल कली
मोहक तुझी अदा आहे
तुझ्या तेजस सोंदर्यावर
विनायक मनापसुनं फ़िदा आहे
-------------------------------

फूल खुशबु देता है
चमन का नाम होता है
निगाहे क़त्ल करती है
हुस्न बदनाम होता है
--------------------------------

झाकले डोळे माझे
तरीही त्याना जाग येते
यात माझा तरी काय दोष
आठवण त्याना तुझी येते
--------------------------------

तुझे माझे नाते
जसे जीवन अणि श्वास
नेहमी माझ्या सोबत रहा
हिच एक आस
-------------------------------

विनायक

९९७५०५८९४९


९९ % अकेले है

७५ % टेंशन मे है

०५ % मुश्किल मे है

८९ % दुःखी है

४९ % याद करते है
तो सब नम्बर मिलाकर कॉल करे
सब ठीक हो जाएगा



..................विनायक ९८२३४७७०३५

लडकी - लड़का


लडकी : ना छेड़ नाजनिको पाप होगा
कल तुभी किसी हसीना का बाप होगा
लड़का :खुदा करे तेरी बात सच्ची हो
मुझे पापा कहे वो तेरी ही बच्ची हो

शायरी

ईस क़दर ना हर्बात यार्रों से पूछो ।
जो बात राज कि है वो बात इशारो से पूछो
लहरोसे खेलना शोक है समुंदर का
लगती है चोट कैसी किनारोसे पूछो
-------------------------------------

एक दूवा मांगते है हम आपने खुदासे
चाहते है ख़ुशी पुरे इमान से
सब हस्राते पुरी हो आप कि
ओर आप मुस्कुराये दिल ओ जान से
-------------------------------------

कोई लडकी हमे ठुकराये इसका गम नही
कोई लडकी हमे ठुकराये इसका गम नही
बदनसीब वो लडकी है
जिसके नसीब मे हम नही
-------------------------------------

हर पत्थर पे लिखू I MISS YOU
ओर वो हर पत्थर आपको जोर से मारू
ताकी आपको ये एहसास हो
कि आप कि याद कितना दर्द देती है
-------------------------------------

हम ना होते तो आप को गजल कोण कहता
आपके चेहरे को गुलाब कोण कहता
यही तो करिश्मा है हम प्यार करने वालोंका
वरना पत्थर को ताज-महल कोण कहता

Monday, 2 July 2007

मुझसे मिल कर


तेरे होंठों से लग कर यह हवा शराब बन गयी
आंखों से लग कर यह हिजाब बन गयी
और गालों से लग कर यह गुलाब बन गयी
सच ही कहती है यह दुनिया जानेमन
कि तू मुझसे मिल कर लाजवाब बन गयी


.........विनायक

लग्नाआधीचे


लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण लग्नानंतर त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...

लग्नापुर्वी
तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.

ती : मी जाऊ का निघून?

तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.

ती : तुझं प्रेम आहे माझ्यावर?

तो : अर्थातच!

ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?

तो : नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?

ती : तू माझं चुंबन घेशील?

तो : हो तर.

ती : तू मला मारहाण करशील?

तो : अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाही.

ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?

तो : हो.

लग्नानंतर...

लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद लिहिण्याची गरज नाही... फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा !


.............. अर्जुन

Wednesday, 27 June 2007

नाते



नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोन समजावयाचे,?
सागं आठवण आली की काय करायचे,?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सागं आठवण आली की काय करायचे,

नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सागं आठवण आली की काय करायचे,?

फोन मात्र मीच करायचं,
H…..R… U मत्र तू बोलायचे,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे,
सागं आठवण आली की काय करायचे

Monday, 25 June 2007

आठवतं तुला..?


आठवतं तुला..?

ती म्हणाली,
" आठवतं तुला...
त्या अनोळखी रस्त्यांवरून
तू माझ्याबरोबर यायचास
मदत म्हणून..
आज सारे रस्ते ओळखीचे झालेत
म्हणून तू अनोळखी व्हावं
असं थोडीच आहे?

मला रस्तेच हवे असते
तर कसेही शोधले असते
त्यासाठी कुणाच्या
ओळखीची गरज नव्हती
मला तुझी मदत नको,
सोबत हवी होती..."

तो उत्तरला,
"आठवतं तुला .....
तू दबकत चालत जायचीस
त्या रस्त्यावरच्या फुलांना
दुखवू नये म्हणून..
तुझा क्षणिक स्पर्शही
त्यांना पुरेसा झाला असता...
माझ्या प्रेमाचं सार्थक करण्यासाठी.

तुला कधी समजलंच नाही
ती मीच अंथरली होती...तुझ्यासाठी.
ज्या स्वप्नांना तू अस्पर्श सोडून गेलीस
आपली नाहीत समजून
तुला कधी उमजलंच नाही
ती फक्त तुझीच होती म्हणून...........

तुझ्यासोबत..............


तुझ्यासोबत

कधीतरी पहाटे
एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी,
आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी,
यासारखं सुख ते काय?

कधीतरी भांडताना
एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी,
आणि ती छॊटीशी जखम
दिवसभर छळत रहावी,
यासारखं दु:ख ते काय?

कधीतरी रविवारी
सगळं घर पसरलेलं,
आणि दुपार नुसतं पडून
आळसात घालवावी,
यासारखी मजा ती काय?

कधीतरी रडताना
तू एखादं वाक्य टाकावं,
आणि मी रडता रडता हसले
की पटकन कवेत घ्यावं,
यासारखा आधार तो काय?

कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध,
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर
एका नजरेतंच समर्थन मिळावं,
यासारखं बळ ते काय?

कधीतरी चुकताना
मला तू वेळोवेळी बजावावं,
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर
पुन्हा एकदा समजून सांगावं,
यासारखं प्रेम ते काय?

कधीतरी हसताना
तुझ्या डोळ्यांत पहावं,
आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं
सार्थक झालं असं वाटावं,
यासारखं समाधान ते काय?

कधीतरी जगताना
जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं,
यासारखं आयुष्य ते काय?

भेट आपली......


भेट आपली......

काल जेव्हा तु रस्त्यात भेटला होतास,
एक प्रेमपुर्ण कटाक्ष तुही टाकला होतास....
हर्ष माझ्या मनीचा दाटून आला होता
खुप होते उरी तरीही ,
ओठांवर होते मात्र जड ओझे..

माझा खुललेला चेहरा
तुलाही जाणवला होता..
भेट मात्र ती क्षणभराचीच होती
वाटलं होतं तेव्हा
असाच तू जवळ रहावास
तुझ्या कुशीत शिरुन
स्वर्गच इथुन अनुभवावा
पण स्वप्न माझे शेवटी
स्वप्नच राहीले होते ....
निर्णय तेव्हा तूच घेऊ शकत नव्हातास
म्हणुनच इच्छा असुनही
निरोप तूच घेतलास

मग मात्र एवढचं वाटलं......

परदेशीच जर जायचं होतं
नॊकेत बसुन तुला ....
तर निरोपापुरतच का बोलावलस
किनारयावरती मला !

... प्रज्ञा

कधी वाटते ...


कधी वाटते ...

आज वाटते फुल फुलावे
तुझीया कोमल ओठांचे ,

कधी वाटते प्राषून घ्यावे
टिपूर चांदणे तूझ्या रूपाचे..

मुक्त फिरावे पाखरू चंचल
तुझीया दोन नयनांचे...

स्वर घुमावे कानी अवचित
तुझीया सुरेल कंठाचे..

अशीच व्हावी संगत गंधीत
तुझीया जवळ असण्याने

अन

असेच गावे गीत सुरातच
तुझीया माझ्या प्रीतीचे....

एक कोडं


एक कोडं

ते दिवस होतेच तसे....
गुलाबी थंडीतल्या त्या
कोवळ्या उन्हासारखे.....
हवेहवेसे........
त्यावेळेस सर्वच कसं विलोभनीय....
पण मग आज ?
कुठेशी गेली ती ओढ ?
का आपल्यातल्या अंतराने.....
आपल्यालाच अंतर दिलं ?
तोच तु, तीच मी .... तरीही....
एक न उलगडणारं कोडं....
मनाच्या कोपरयात ठेवलेलं गुपित
असं अचानक कोमेजावं ?
तुझ्या माझ्यातले संवाद
असे मध्येच का गोठावेत ?
स्वत:चाच स्वता:वर
विश्वास बसेनासं काहीतरी .....
खरंच काहीतरी झालय खरं.....
बघ, उलगडतयं का कोडं .....
मी आहे इथेच,
वाट पहात,
उत्तराची अन.............

तुझं असणं....


तुझं असणं....

तुझं माझ्या आयुष्यात येणं
माझ्यासाठी निराळंच ठरलं
अगदी एखाद्या फ़ुलासारखं
मोहक, नाजुक,अलगद, हळुवार
तसंच काहीसं सुंदर.....

कळी उमलताना वाटलचं नाही
की त्याला एवढा बहर येईल,
कदाचित म्हणूनच त्याचं असणं
आल्हाददायक वाटावं
तुझं प्रेमही तसंच
अमॄतासारखं मधुर
नवजीवन देणारं

माझंही काहीसं तसंच झालंय
आज जगण्याला अर्थ आलाय
अगदी हवहवसं काहीतरी .....
अन तेही , फ़क्त तुझ्यामुळे
फ़क्त तुझ्यामुळेच

... प्रज्ञा

आशा


जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली..


प्रस्तावना : ह्या कवितेत एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या भेटीची इच्छा व्यक्त करते आणि ह्या प्रेमाच्या नात्याला विवाहाच्या निर्मळ बंधनात गुंफण्याची जिद्द व्यक्त करते.

** जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली.. **

जेव्हा जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली,
तेव्हा तेव्हा पायात माझ्या, बेडी मी पाहिली..
खळकन ओघळले अश्रू गालावरी,
प्रत्येक अश्रूत तुझी प्रतिमा मी पाहिली..

अश्रूंस त्या अलगद मी उचलले,
प्रतिमेस त्या ओठांनी स्पर्शिले..
क्षणांत चेह-यावर हास्य विखुरले,
जरी मनात वेदनेचे बांध होते फुटले..

अशीच होणार का रे आपली भेट,
किना-यांची नजरानजर जशी होते थेट..
प्रेमाला या, नजर का लागावी जगाची,
पण,प्रेमिकांनीही हार कधी ना मानली..

तोडायला बेडी आता, ये तू अश्वावरी,
मी मेहंदीने, कडी बघ एक तोडली..
मंगल या सूत्रांत गुंफूनी प्रीत आपुली,
चालूया अग्निसाक्षीने मंदिरात सप्तपदी..

तू


घरात असतेच तेव्हा गृहलक्ष्मी असतेस
बाहेर पडताना स्वप्नपक्षी असतेस
बॅंकेत तू लक्ष्मी बनतेस
अभ्यास घेताना गृहिणी होतेस
पहूडताना स्वामिनी बनतेस
उठवताना चेतना बनतेस
थोपटताना आई बनतेस
वाढताना अन्नपूर्णा दिसतेस
भांडताना रागिणी होतेस
रुसताना "भामिनी' दिसतेस
कंबर कसून उभी ठाकते
आधण ठेऊन चहा टाकते
तांदूळ भिजवून कुकर लावते
भाजी चिरून फोडणी करते
डबा करून, डबा भरते
गाडी घेऊन ऑफिस गाठते
घरी येताच गृहिणी बनते
स्वयंपाकाची तयारी करते
सर्वांना सांभाळून अभ्यास घेतेस
गुणांवर लक्ष ठेवते
पाहुण्यांना चहा देते
ज्येष्ठांना मान देते
रात्री थोडा विचार करते
उद्याची तेव्हाही काळजी करते...

चारोळी


तुझ्यासाठी रोजच मी
चारोळी लिह्ण्याचं ठरवतो
पण तुझी आठवण येते
आणि हातच लिहायचा थांबतो.

पाण गळताना झाडाला
दुःख होत असेल का?
मला सोडुन गेल्यावर
तुला झालं होत का?

तुझ्या अश्रुंच्या धारेन
माझ्या मनाचं अंगण पार ओळं केलस
जवळ येवुन चिंब भिजवलस
आणि दुर जावुन कोरडं केलस

भोवताली अनेक जण मला
त्रासलेले दिसतात
जीवनात येणारं अपयश पचवत
जनू ती जगत असतात

मी ही आता स्वतःचं
अस्तित्व निर्माण करतोय
दुसर्यांच्या मदतिच्या कुबड्यां पासून
स्वतःला वेगळं करतोय

अशा ह्री मानसाला
अंधारातील किरण भासते
आशा बाळगूनच ह्र्दय
लाख जख्मा ही सहन करते-

डोळ्यात अश्रू दाटले कि
मी लगेच एकांत शोधतो
भरुन आलेल्या आभाळाला
मनसोक्त बरसु देतो

माझ्या घराला मी
कधीच कुलुप लावित नाही
घर तर दुःखानेच भरलय
आणि दुःख कोणचं चोरत नाही

नाटकात मला रडताना पाहून
लोकांनी माझा नटसम्राट केला
हसण्याची जेव्हा वेळ आली
माझ्यातला कलाकारच मेला

मी ज्या वाटेवरुन चालतोय
त्यावर काटेच पेरले आहेत
माझ्या वाटेवर काटे पेरुन
माझे आपलेच गेले आहेत

अंधाराचा मला त्रास होत नाही
उजेडच मला सतवितो
अंधारात दडलेलो मी
उजेडात मात्र उघडा पडतो

शेवटच्या क्षणी मेणबत्ती
जास्तच त्वेषाणे पेटली
दुसर्यांसाठी शेवटपर्यंत जळायचं
हेच सांगत ती विझली

नात्याचं बंधन नाजूक असतं
त्यावर विश्वासाचं पांघरून घातलं पाहीजे
परिस्थिती कितीही वाईट असली
तरी विश्वास कायम राहीला पाहीजे

ह्रदयावरील जख्मा ही भरल्या जातात
काही काळ जाऊ द्यावा लागतो
दुःखा नंतर सुख ही येतं
थोडा धीर धरावा लागतो

सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी
मी वणवा होऊन पेटलो
काही काळ अंधार दूर झाला ही
मी मात्र कायमचा विझलो

शब्द अनमोल आहेत
ती जपून वापरायची असतात
फ़ळ्यावरील पुसता येतात
मनातील मात्र कायम राहतात

जग सोडून जाण्याचा
नेहमी विचार करतो
तुमची आठवण येते
आणि मी पुन्हा मागे फ़िरतो

विनायक बोभाटे १४३

आंधळं प्रेम


आंधळं प्रेम
जन्मापासूनच अंध होता तो तरीही ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची;तोही तीच्यावर तीतकेच प्रेम करायचा..एक दिवस तीने त्याला लग्ना विषयी विचारले...
"ज्या दिवशी मी तुला पाहू शकेन त्याच दिवशी मी लग्न करीन" तो म्हणाला.
ती उदास झाली...कित्येक दिवस असेच गेले.
पण एक दिवस...
त्याच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं;कोणा अनामीकाने दान केलेल्या डोळ्यांमुळे आज तो अंधतेच्या श्रापातून मुक्त झाला....आता तो सर्वकाही पाहू शकत होता पण त्याला तिला पहायचे होते,तो सरळ तिच्याकडे निघाला...
त्याची नजर तिला शोधत होती पण ती मात्र दिसत नव्हती,पाठीमागून ओळखीचा आवाज आला; त्याने तीचा आवाज लगेचच ओळखला आणी उत्सुकतेने वळून पाहीले, समोर ती उभी होती, क्षणभर त्याला विश्वास बसेना;
डोळ्यांवर काळा चष्मा आणी हातात काठी घेऊन उभी असलेल्या तीच्याकडे तो तसाच पहात राहीला;
तीने त्याला विचारले "माझ्याशी लग्न करशील?"
त्याने नकार दिला आणी चालू लागला.
ती म्हणाली "ठीक आहे, पण माझ्या डोळ्यांची तेवढी काळजी घे".

सांगशील का जरा ?


सांगशील का जरा ?

एकदा मी कवितेलाच विचारले...

काय गं काय नातं आहे

तुझं नि माझं

ज्यामुळे मी एकटा असल्यावर

तु आणतेस तुझ्याकडे खेचुन,

आणि मी पण वेडयासारखा धावत येतो

तुझ्याकडे शब्द ओंजळीत घेऊन,

सांगशील का जरा ?


अनुभुतीच्या सुरुवातीपासुन

अभिव्यक्तिच्या सावटापर्यंत

का मी हे सगळं कागदावर उतरवतोय

कोण माझ्या लेखनीची शाई संपवतय?

सांगशील का जरा ?

तु बोलवल्यावरच कसे

मनातते विचार येतात..

हळुहळु स्वत:हुनच कसे

ते कागदावर उतरु लागतात

तु काही विचारलस की

मुक्या, अबोल भावनाकश्या काय

पटापट बोलु लागतात

सांगशील का जरा ?

का मी एखाद्या चित्रकारासारखे

डोळयातल्या आसवाने

तुझं चित्र रेखाटायला लागलो....

का गं ईतका मी का

'तिच्याशी' चुकिचा वागलो

सांगशील का जरा ?

तुझ्या प्रत्येक कडव्याच्या

वाटेवर फ़िरताना मी

का तिच्या आठवनीची

एक निशाणी ठेवतोयका ?

आणि कशाला ?

सांगशील का जरा ?

जमत नाही गं आता

हे सारखे सारखे

तीची आठवण काढणं

जीला विसरायचा प्रयन्त करतोय

तिलाच परत शब्दांत मांडणं...

तिच्या आठवणीने जीव

माझा जाळतोय पण ..

तुझ्यामुळे त्या वेदनेचा भाव

सर्वांना कसा कळतोय

सांगशील का जरा ?..सांगशील का जरा ?

मनं माझ तुझसाठी वेडं का......?


मनं माझ तुझसाठी वेडं का......?


मनं माझ तुझसाठी वेडं का......?

आज बरसत्या पावसासवे

हे भंयकर वादळ का ......?

आयुष्यभर तुझ्यासवे जगण्याचस्वप्न

आज असे तुटल का......?

तुझ्या प्रेमला मुकलोय तरी

तु माझीच आहेहा व्यर्थ भास का ......?

पानावरच्या दवासारखी तुझी साथ

जिवनात माझ्या क्षणभंगुर का......?

तु दिलेल्या वेदना मनाच्या प्रत्येक कोप-यात्त पसरल्यावरही

अजुनही हे मन तुझ्यासाठी वेड का......?

तु विसरलीस मला हे माहीत असुनही

माझ हे मन तुझ्या आठवणीत बैचैन का......?

भंगलेल्या स्वप्नालाच पुर्ण करायचयं

हे वेड स्वप्न उराशी बाळगुन का......?

तुझ्या मनापर्यंत पोहोचल्यावरही

माझ्या मनाचा कागद कोरा का......?

जिला माझ्या भावनाच कळल्या ना कधी

तिलाच प्रत्येक शब्दातुन मांडतो का......?

सगळे संपले असतानाही

तु माझीच होशिल हा व्यर्थ भास का......?

नेहमी स्वत:ला तुझ्या डोळ्यात शोधन्याच्या प्रयत्न करणा-या

माझ्या या डोळ्यात आज आसवांची माळ का......?

आयुष्यभर जीवनाच कोडं सोडवणा-याला

आपल्या जिवा ऎवजी त्या कोड्याचच महत्व का......?

तु परत येणार नाही ही जाणिव असतानाही

हा जीव जायचा थांबला का......?

सरणावर झोपल्यावरही मनात मझ्या

तुझ्या सवे जगायची इच्छा का......?

मनं माझ तुझसाठी वेडं का......?

खूप दिवस झाले असतील..


खूप दिवस झाले असतील..

खूप दिवस झाले असतील...
लहाणपणी अंगणात मैत्रिणींसोबत खेळतानामधूनच चिडून उठून गेलीस,
आणि लिंबामागे जाउन लपून बसलीस;
पण कुणीच आलं नाही तुझी समजूत काढायला
मग तुझी तुच उठून गेलीस सरपण आणायला...
खूप दिवस झाले असतील...

आठवतं एकदा पाण्याला गेलेली असतानामधेच आमराईत रेंगाळलीस,
कै-यांच्या आंबटओल्या गंधानं मोहरुन गेलीस
पण, कोकिळेच्या कूजनामागून जेव्हा 'माय'ची हाक आली-
दिस ढळायच्या आत परतण्यासाठी तुझी लगबग सुरू झाली...
खूप दिवस झाले असतील...

तव्यावरची भाकरी तव्यावरच करपली होती
कुणास ठाउक कुठे तू अगदी हरपली होती
मग तू भानावर कशी आली ते तुल ठाउकच आहे
मानेवरचा दाह अजून कुठेतरी खोलवर जळतच आहे..
खूप दिवस झाले असतील...

पत्र्यातून झिरपणा-या चांदण्याकडे बघून
'त्या'ला उठवावं असं मनात आलं असेल दाटून
ते मनातलं चांदणं मनातच साठवून ठेवलंस
मन मारुन जगायचं अंगवळणी पाडून घेतलंस...
खूप दिवस झाले असतील...

खरंच खूप दिवस झाले असतील आता...
आपण खूप सोसलं वगैरे ही जाणीवही नसेल आता
पण, तू साठवून ठेवलेलं चांदणं तुझ्या डोळ्यांतून सांडत असतं
अन तुझीच कहाणी तुझ्याही नकळत गदगदून मांडत असतं...

दु:ख


दु:ख

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे..

Friday, 22 June 2007

निर्णय

एका शहरात राहणार्‍या 'तो' आणि 'ती' यांची हि गोष्ट आहे. खुपच कोवळ वय होतं त्यावेळी दोघांच ज्यावेळी त्याने तिला प्रपोझ केलं तेंव्हा. ती अकरावी मधे आणि तो बारावीत. खरं म्हणजे त्यावेळी त्याने केवळ आकर्षणातुन आणि त्या वयात उमलणार्‍या भावनांना प्रेम समजुन तिला प्रपोझ केलं आणि तिची सुद्धा परिस्थीती काही वेगळी नव्हती. पण तरीही तिचा होकार त्या दोघांना एका अनामीक पण गोड बंधनात बांधण्यासाठी पुरेसा होता. मात्र लवकरच कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि होकारांनंतर पुढे भेटीगाठी वाढण्या अगोदरच त्यांचा भेटण्याचा मार्ग बंद झाला. त्या पुर्वी ते केवळ दोन तीन वेळाच भेटले होते. सुट्टित भेटण्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न केले पण दोघांच्या घरच्या परिस्थी नुसार त्यांना भेटणे शक्यच नव्हते, मग त्यांना एक आधार मिळाला तो म्हणजे फोन चा. घरच्यांची नजर चुकवुन दोघे बर्‍याच वेळी फोन वरुन एकमेकांशी संपर्क साधत असत, अर्थात तो ही खुप कमी वेळेला पण अगदीच न भेटण्यापेक्षा त्यांना तेवढे बोलणे पुरेसे होते. आणि एकाच शहरात असल्यामुळे बर्‍याच सार्वजनीक ठिकाणी त्यांची भेट घडायची, अर्थात ही भेट सुद्धा केवळ नजरेचीच असायची कारण तिच्या बरोबर किंव्हा त्याच्या बरोबर नेहमी कुणितरी असायचेच.

बारावीच्या निकाला नंतर त्याने इंजिनियरींग ला प्रवेश घेतला आणि त्यासाठी तो दुसर्‍या शहरात गेला, आणि इथुन खरी सुरुवात झाली त्यांच्या प्रेमाच्या परिपक्वतेला. कोवळ्या वयात सुरु झालेल प्रेम कुठवर जाईल याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती पण तो दुसर्‍या शहरात जाताच दोघांनाही आपल्या मधे निर्माण झालेल्या एक नाजुक बंधंनाची जाणिव झाली. पहिले दोन महीने त्या दोघांना एकमेकांना पाहणे अशक्य झाले होते आणि फोन वरुन सुद्ध संपर्क झाला नव्हता. आणि याच काळात त्या दोघांना प्रेमाचा खरा अर्थ, ती हुरहुर, ती हरवुन जाण्याची लक्षणं या सगळ्या सगळ्यांचा अनुभव येत होता. आणि एक दिवस त्याने तिला फोन केला त्यावेळी दोघेही निशब्द झाले होते, खरं म्हणजे काय बोलावं ते ही सुचत नव्हतं, आणि आपल्याला नेमकं काय होतय ते सुद्धा कळत नव्हत.बर्‍यच वेळ निशब्द संवाद झाल्यानंतर त्या दोघांनाही कंठ फुटला आणी मग बराच वेळ ते बोलत राहीले, आता दोघांना एकमेकांची नविन ओळख होत होति. जस जसे दिवस पुढे जावु लागले तस तसे ते एकमेकात गुंतत गेले, खरं म्हणजे इतरांच्या बातीत जे खुप अगोदर होतं ते या दोघांच्या बाबतीत नंतर होत होतं. तिला त्याची पुर्ण ओळख पटु लागली होती. कॉलेज ला असतांना न चुकता दिवसातुन किमान एकदा त्यांच फोन वरुन बोलण होत असे, आणि तो सुट्टीला घरी आला की पुन्हा नजर भेट (!). चोरुन भेटण्यात किंवा बोलण्यात असलेला निराळाच आनंद त्यांना मिळत होता. आता कधीतरी वेळ साधुन ती तिच्या मैत्रीणी सोबत किंवा कुठलेही कारण साधुन त्याच्या घरी येत असे, उद्देश एकच त्याला डोळे भरुन पहावे बस्स. वेगवेगळ्या प्रसंगातुन त्या दोघांच्या मनाचे भावबंध उघडत होते.

एव्हाना त्या दोघांचे नात खुप दृढ झाले होते, आणि त्यांच्या या प्रवासाला तीन वर्षे पुर्ण झाली होती. त्याचा जबरदस्त आत्मविश्वास, त्याची philosophy , त्याचे प्रेमाबद्दलचे विचार, त्याची देवावरील श्रद्धा य सगळ्या बद्दलचे विचार या सगळ्या सागळ्या गोष्टी तिला त्याच्या प्रेमात हरखुन जाण्यास भाग पाडत होत्या. तर तिची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक वळणावर आपल्याला साथ देण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी त्याला भावत होत्या. या दोघांच्या प्रेमाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीन चार वर्षांच्या कालावधीत ते एकमेकांना समोरासमोर केवळ पाच सात वेळा केवळ भेटले असतील, आणि प्रत्येक भेट केवळ तीन चार मिनिटांची. एवढ्याच अवधीत ते प्रेमाच्या एका वेगळ्या पातळीवर येउन पोहोचले होते. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली होती की त्या दोघांचे प्रेम केवळ शारीरीक आकर्षणातुन आलेले नव्हते, तर ते एका वरच्या पातळीवर होते. एखाद्या व्यक्ती वर भान हरपुन प्रेम करणे म्हणजे काय असते हे त्या दोघांकडे पाहुन कळत असे. आणि दोघेहि एकमेकांच्या भावना जपत, एकमेकांच्या परिवारा विषयी काळजी घेत आपल्या जीवनाला आकार देत होते. त्यांच्या एकमेकांना जास्त न भेटण्याचं कारण कुणाची भिती वाटणे हे नव्हते, तर दोघांना ही आपल्या मुळे दुसर्‍याला घरी त्रास होउ नये असे वाटत होते, एकमेकांच्या याच प्रेमापोटी खुप इच्छा असुनही त्यांच्या भेटी खुपच मर्यादीत होत्या. पण त्यांच्या फोन वरुन \nबोलण्यामधे जास्त सुरक्षीतता असल्यामुळे फोन हेच दोघांच्या भावना पोचविण्याचं साधन बनलं होतं. एखादा दिवस त्याच्याशी बोलणं झाला नाही की तिच मन सैरभैर होत असे आणि त्याचं सुद्धा कशातच लक्ष लागत नसे. अगदी सकाळी उठल्यापासुनची दिनचर्या दोघं एकमेकांना सांगत असतं. एकमेकांविषयीची काळजी मागे सोडत हे संभाषण संपत असे. दोघांचे विचार तर एवढे जुळत होते की ते प्रेमात पडले याचं कुणालाच नवल वाटु नयेत. एकमेकांच्या झालेल्या चुका दाखविण्यात आणि त्याबद्दल माफी मागण्यात सुद्धा ते मागे नव्हते. तासनतास बोलण्यासारख प्रेमी जणांकडे असतच काय असा प्रश्न त्यांना पुर्वी पडत होता पण आता त्याचं उत्तर त्यांना स्वतः च्या उदाहरणावरुन मिळत होते. बोलण्यासाठी किंबहुना विषयाची गरजच पडत नसे, कुठल्याही विषयावर हे बोलणे सुरु राही, मग त्यात \'जेवण झालं का\' या साध्या प्रश्नावरुन थेट \'तुला माझी आठवण येते का\' या प्रश्नापर्यंतचा रंजक प्रवास असायचा. \'फोन\' च्या शोधाबद्दल प्रेमात पडलेल्यांनी दिलेल्या अनेक अनेक धन्यवादामुळे ग्राहम बेल नक्कीच स्वर्गात गेला असेल. प्रेम तर कुठही बघायला मिळत पण प्रेमाचा हा वेगळा अविष्कार दुर्मिळ असतो. खुप खुप वरच्या पातळीवरील प्रेम, ज्यामधे शरिराबद्दलच विचारही नसतो, आणि एकमेकांवर असते ते श्रद्धा, निखळ आणि पवित्र प्रेम. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला तेथील वातावरणातुन एक वेगळीच अनुभुती जाणवते, मन अगदी हलक होउन शांत होत जात थेट तसाच अनुभव ते दोघे जगत होते. समाधीच्या अवस्थे नंतर चेहर्‍या वर एक प्रकारचं मंद स्मित फुलते, त्याचा उगम सामन्याला कधीच कळत नाही, मात्र ज्याच्या चेहर्‍यावर ते स्मित झळकत असते तो अनामिक शांतीचा अनुभव घेत असतो, त्याचा परिस्थीतितुन हे दोघे जात होते.


पुढच्या वर्षी त्याचे कॉलेज संपले आणी लगेचच त्याला एका मोठ्या कंपनी मधे नोकरी सुद्धा मिळाली. तो दिवस त्या दोघांसाठी अवर्णीय असा आनंद देणारा होता. आता लवकरच त्या दोघांचे ऐक्य शक्य होते, खरं म्हणजे त्यांचे मानसीक ऐक्य खुप पुर्वीच झाले होते पण तरीही त्याला समाज मान्यता मिळण्याची गरज होती. नोकरी निमीत्त त्याला आणखी एका दुरवरच्या शहरात जावे लागणार होते म्हणुन खरं म्हणजे दोघांनाही वाईट वाटत होते पण तरीही भविष्यातील सुखद काळ आता त्या दोघांनाही खुणावु लागला होता. गेल्या पाच वर्षापासुन दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रेमाला आता एक नवे वळण लवकरच लगण्याची शक्यता होती. त्याने नवीन शहरात जाउन जम बसवला, आणि या दरम्यान तिच्याशी न चुकता बोलणे सुरु होतेच. आताशा बोलण्याचा विषय थोडासा पुढे गेला होता आणि तो लग्ना पर्यंत येउन पोहोचला होता. बोलण्यातुन त्या दोघांनी एकमेकांना आपापल्या घरतील लोकांची त्यांच्या जीवनसाथीदाराबद्दालची कल्पना सांगितली. आणि दोघांनाही आपला जोडीदार या अपेक्षांवर पुर्ण उतरेल याची खात्री होती. पुढे येउ घातलेल्या सहजीवनांच्या कल्पना रंगवत त्यांचे दिवस जात होते, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत आपण कसा संसार करु याची ती दोघे उजळणी करत असतं. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी आपपल्या होणार्‍या बाळांची नावे सुद्ध ठरवुन ठेवली होती. एकदा सहज म्हणुन त्याने दोघांची कुंडली परिसरातील एका ज्ञानी व्यक्ती कडे पाठवुन बघितली आणी त्याचे उत्तर मिळाले तेंव्हा तर त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्याच्या नुसार दोघांचे ३६ पैकी ३३ गुण जुळत होते, आपण खरोखरच Made for each other आहोत याच्या त्या गोष्टीमुळे शिक्कमोर्तब झाले.

मधल्या काळात तिचे लग्नाचे वय झाल्यामुळे तिच्या घरी स्थळ येण्यासाठी सुरुवात झाली होती, पण मला पुढे शिकायचे आहे या सबबी खाली तिणे या सर्व मुलांना टाळले होते आणी एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या आई बाबांनी सुद्धा तिच्या इछेपुढे जास्त जोर दिला नव्हता. \n\n\n \nपण एकदा मात्र एक खुप चांगल स्थळ तिच्या साठी आलं होतं आणी कुठल्याही उपवर मुलीच्या आई वडिलांनी केला असता तो विचार त्यांनी सुद्धा केला. पण ती ने तो विचार ठाम नकार देउन परतवुन लावला पण या प्रसंगानंतर आता आपल्याला जास्त दिवस असा विरोध करत राहता येणार नाही असं तिच्या लक्षात आलं आणि म्हणुन एक दिवस तिने त्याच्या शी बोलतांना हा विषय काढला.

"अरे, मला वाटतं आता आपण घरी सांगुन टाकायला हवं, कारण आता फार दिवस मी आलेली स्थळं परतवु शकणार नाही."

"अगं तशी माझी काहिच हरकत नाही पण माझ्या नोकरीत अजुन माझे Confirmation आले नाही आणि confirmation च्या अगोदर पासुनच मी लग्नाचा विचार करण थोडसं बरोबर वाटत नाही .."

"अरे येइलच ना तुझ confirmation लवकरच आणि हवं तर सध्या फक्त सांगुन ठेउ घरी, आणि मग confirmation नंतर लग्नाचा विचार करता येईल"

"चालेल, मग मी आजच आईला सांगतो, "

"आणि मी माझ्या आईला, पण ठावुक आहे ना रे कसं सांगायचं ठरलं आहे ते.."

"हो गं, मी तसचं सांगणार आहे.."

या निरागस प्रेमाचा एक निर्णायक टप्पा आला होता, आणि आता या क्षणी कुठलीही चुक होउ नये याची त्यांनी खबरदारी घेतली होती. तसे दोघेही आपपल्या घरी लाडके होते, पण तरीही त्यांच्या प्रेम विवाहाला कितपत पाठींबा मिळेल या बद्दल त्यांच्या मनात थोडीशी शंका होती. आणि म्हणुनच त्यांनी एक उपाय योजला होता, तो म्हणजे घरी प्रेम विवाह करायचा आहे हे सांगायचेच नाही, तर रितसर एखाद्या व्यक्ती मार्फत त्याच्यासाठी त्याच्या घरी बोलणी सुरु करयाची, त्याचाच पुढचा टप्पा म्हणुन तो कांदेपोहे कार्यक्रम तिच्या घरी जावुन करणार आणि सगळा काही normal आहे असं भासवत लग्न करणार असा plan त्यांनी आखुन ठेवला होता. दोघांची जात एकच असल्यामुळे आणी दोघांच्याही घरात लग्नासाठी तयारी सुरु असल्यामुळे यात काही problem येईल असे वाटत नव्हते. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी कांदेपोहे कार्यक्रमाची रंगीत तालीम सुद्धा केली होती, म्हणजे तो काय प्रश्न विचारणार, त्यावर तीने काय उत्तर द्यायची वैगरे सगळ काही Fixed होतं, Arranged Love Marriage करायला निघाले होते ती दोघे. या साठी ती आपल्या एका मावशीला विश्वासात घेउन सांगणार होती. तिने एक दिवस त्या मावशीला सगळा प्रकार सांगितला आणि मदत करण्याची विनंती केली. त्या मावशीनेही जास्त आढेवेढे न घेता लगेचच तिच्या आई कडे जावुन तिच्या साठी एक योग्य स्थळ आहे असं सांगुन त्याच्या घराविषयी माहीती सांगितली. तिच्या बाबांनी मुलाविषयी आणि त्याच्या घराविषयी जास्त माहीती काढली आणी सारे काही व्यवस्थीत आहे याची खात्री पटताच त्यांनी त्याच्या घरी जाउन बोलणी करण्यास तयारी दाखविली. हे सगळ ऐकताच तिला कधी हे सगळं त्याला सांगते असं झालं होतं. त्या रात्री त्या दोघांनाही झोप आली नव्हती, आपल्या पाच वर्षाच्या प्रेमाची एक प्रकारे पुर्तता होणार असे त्या दोघांना वाटत होते.

तो सुट्टी घेउन आपल्या घरी आला होता आणी जणु काही घडलेच नाही अशा अविर्भावात वावरत होता पण आतुन परमानंद झाला होता. आता कुठल्याही क्षणी तिकडुन निरोप येईल आणी मग \'कांदापोहे\'. एक दिवस तिचे काका त्यांच्या घरी आले आणी त्याच्या आई बाबांशी बोलुन निघुन गेले. मोठ्या उत्सुकतेने त्याने घरात पाउल ठेवले आणि आई च्या उद्गाराने ते पाउल जागीच अडखळले. आई बाबांना सांगात होती "त्या घरातील मुलगी आपली सुन म्हणुन आपल्या घरात येउ शकत नाही!!".. हे सगळे त्याला अनपेक्षीतच होते. दोन क्षण त्याला काहीच कळेना. थोड्या वेळानंतर घरात कुणिच बोलत नाही हे बघुन नाईलाजाने त्यानेच विषय काढला,

"आई, ते काका कशाला गं आले होते "

"तुझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं त्यांनी ", "असं, कुठलं बरं.. ? "

"\'ती\' "

"मग काय सांगितलस तु त्यांना " \n"काय सांगायचं, तसं अजुन सांगितलं नाही काही, पण नाही म्हणुन सांगणार आहे "

"का?, मुलगी बघण्याच्या अगोदरच नाही, ते का बरं..:"

"त्यांच्या घरातील मुलगी आपल्या घरात सुन म्हणुन नको आणि का ते विचारु नकोस "

"अगं पण असा काय problem आहे काय हरकत आहे ते सांगशील की नाही "

"हे बघ तु हा प्रश्न विचारु नकोस, त्याच्या मागे खुप मोठं कारण आहे असं समज, आणि हा विषय इथेच संपव "

"पण जर मी असं म्हणालो की मला तिच्याशीच लग्न करायचे तर ??"

"तर तुला हा आग्रह सोडावा लागेल, माझी तुझ्या लग्नाला किंबहुना प्रेम विवाहाला सुद्धा परवानगी आहे, पण त्या मुलीसोबत शक्यच नाही "

"हे बरं आहे तुझं, म्हणे प्रेम विवाहाला परवानगी आहे पण फक्त त्याच मुली सोबत नको, असं काय घोडं मारलय तिने तुमचं "

"माझ्या नकारामागे काही तरी विशेष कारण असेल एवढं समजुन घेशील अशी मला अपेक्षा आहे. " आई चा आवाज खुप हळवा झाला होता..

त्यानंतर त्याने खुप वेळ आई बाबांशी वाद घातला, पण ते दोघेही आपल्या मतावर ठाम होते, आणि ते कारण सांगायला सुद्धा तयार नव्हते. त्याच्या मनात विचारचक्र सुरु झाले. .... असं का करावं आईने आणि बाबांनी... त्याचं त्याच्या कुटुंबियांवर खुप प्रेम होतं आणि त्यांच सुद्धा, त्यांचा एक मोठा परिवार होता, आणि सर्व लोक त्यांना एकमेकांना जपणारी माणसं असेच ओळखत होते.... आई बाबांचे विचार फार मागासलेल नव्हते आणि दोघांनी प्रत्येक वेळि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवुन दिला होता मग आजच असं का बरं व्हावं... ज्या अर्थी ते एवढ्या मनापासुन सांगत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल..... , पण म्हणुन काय मी तिला नकार देउ, शक्यच नाही, ....... कदाचीत तिच्या घरातील वातावरण, त्यावर तर काही आक्षेप नसेल ना...... असेल काहीही कारण पण गेल्या पाच वर्षांपासुन मी तिला ओळखतो, न पाहता नकार द्यावा असं तिच्यात नक्कीच काही नव्हतं..........., मग काही घरगुती कारण असेल किंवा इतर काही.... पण कुठलही कारण असेल तरी मझ लग्न तिच्याशी आणि फक्त तिच्याशीच होईल, ..... पण परवानगी तर मिळत नाही मग...... काय करायचं...पळुन जायचं घरातुन....

या विचारावर त्याचं मन येउन थांबलं..... बराच साधक बाधक विचार करुन त्याने आपण घरुन पळुन जावुन लग्न करु शकतो असा विचार केला.... पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकत होते खास.... त्याचं मन कमालीच अस्थीर झाला होतां.,.. काय होत होतं त्याला कळत नव्हतं.,... पण मनात अनेक विचार ढवळुन निघत होते...

थोड्यावेळातच फोन च्या रिंग ने तो भानावर आला.. हा नक्की तिचाच फोन, त्याने विचार केला... काय सांगणार आपण तिला, कसं सांगणार, पुढे काय करायचं असा प्रश्न तिने विचारल्यावर काय उत्तर देणार मी.....

"हॅलो, "

"मी बोलतेय.."

"... बोल " त्याच्या तोंडुन शब्द फुटत नव्हता..

".. अरे काय झालं.. "

"तु मला भेटु शकतेस का आत्ता "..

"आत्ता, बघते प्रयत्न करुन, पन काय झालं सांगशिल की नाही.."

"ते भेटल्यावरच सांगेन पण लवकरात लवकर \'तिथे\' ये "...

थोड्याच वेळात ते दोघेही त्या ठिकाणी आले.. तिने आल्याबरोबर त्याच्या चेहर्‍याकडे बघुन काय झालं असवं ते ओळखले, त्याला काय बोलावं ते सुचत नव्हत, आणी डोळे भरुन आले होते,.. तिच्या ह्रदयाची धड धड वाढली होती, कुठल्याश्या अनामीक शंकेने तिचे मन ग्रासले गेले..

"अरे, काय झालं "

"......"

"बोल ना काय झालं., लवकर सांग ना रे,.. "

त्याने उत्तरादाखल फक्त मान हलवली...आणि ती त्याच्या कुशीत शिरली...

"नीट सांगशील काय झालं.."

"आई ने नकार दिला "

"पण का ते कळु शकेल, माझ्यात अशी कुठली कमी आहे की आईंनी न बघताच नकार दिला "

"तोच तर प्रॉब्लेम आहे ना.. आई काहिच सांगायला तयार नाही.."

तिच्या डोळ्यातुन धारा यायला सुरुवात झाली, बराच वेळ त्या दोघांची अवस्था तशीच राहीली.. भानावर येत तिने निर्धाराने प्रश्न केला

"मग आता काय विचार केलायस तु... "

"माझ मन खुप अशांत आहे गं, मी खुप विचार केला, आणि आपण पळुन जाण्यावाचुन गत्यंतर नाही, असं माझं मत झालं., तुला काय वाटते.."

"पळुन जावुन लग्न... " तिला हे अगदीच अनपेक्षीत नव्हते, तरीही तिला आश्चर्याचा धक्का बसलाच..

"काय गं काय झालं माझ्यावर विश्वास नाही का.."

"तसं नाही रे माझा तुझ्यावर आणि तुझ्या कर्तुत्वावर पुर्ण विश्वास आहे पण..."

"पण काय .."

"विचार करावा लागेल रे, खरं म्हणजे आपण या पुर्वी अनेकदा बोललो आहे तुला आठवतं ते... " तिने बोलायला सुरुवात केली..

"अरे पळुन जावुन लग्न करायला माझी काही सुद्धा हरकत नाही., माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, पण म्हणुन तरीही मला हा विचारच पटत नाही. अरे बरेचसे लोक घेतात हा निर्णय, पण म्हणुन हा निर्णय आपण आंधळेपणाने तसाच स्विकारायचा. या विचाराची एक दुसरी बाजु कुणिच का लक्षात घेत नाही. कुणा दोघांचं एकमेकांवर खुप प्रेम बसतं आणि घरातुन नकार मिळाल्यामुळे ते पळुन जावुन लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण ते कधी त्याच्या पुढे जावुन विचार करतात, नाही. त्यांचं प्रेम त्यांना आंधळं बनवतं. कधी विचार करतात त्या आई बापा चा ज्याने वयाची वीस पंचवीस वर्षे आपल्याला वाढवलेलं असतं, आणि आपल्या सुखासाठी त्यांनी जीवनभर केवळ कष्टच केलेल असतात, असा आई बाबांना केवळ त्यांचा आपल्या प्रेमा साठी सोडुन जायचं. कितीही प्रेम असलं दोन जीवांचं एकमेकावर तरी ते लग्न करण्याचा निर्णय घेतात, कशासाठी, सुखी होण्यासाठीच ना, म्हणजे हा एक प्रकारचा स्वार्थच. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवतासमान आई बापांना दुख देणं कितपत योग्य आहे,.. काही प्रेमी जोडप्यांना लग्नानंतर स्विकारलं जातं तेंव्हा त्यांना वाटतं आपला विजय झाला पण त्यांचा झाला असतो तो पराभव., आई बाप त्यांना स्विकारतात ते केवळ त्या दोघांच्या सुखासाठी. आठवतं आपण प्रत्येकाने लहाणपणी एक निश्चय केलेला असतो, की आपण मोठे झाल्यावर आपल्या आईला नेहमी सुखी ठेवु म्हणुन, मग अरे केवळ आपल्याला सुख मिळावं म्हणुन त्यांना त्रास देण्यात कसलं आलयं प्रेम. प्रेम जरुर करावं माणसानं, आणि प्रेम विवाह सुद्धा करावा, पण तोच विवाह जर सर्वांच्या संमतीने झाला तरच त्याला अर्थ आहे. हे बघ हवं तर आपण घरी चर्चा करु, आपल्या प्रेमाचं महत्व पटवुन देउ, शक्य तेवढे प्रयत्न करु, आपण दोघे एकमेकांनाच परिपुर्ण कसे ठरु शकु हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करु, शक्य ते सर्व काही करु.पण हे सगळे केल्यानंतरही तुझी आई मला स्विकारणार नसेल तर.... " बोलता बोलता तिचा स्वर अडखळला..

"तर तर आपण विभक्त होउन जाउ. तु म्हणत असशिल कीती निर्दयी आहे मी हो ना.. पण अरे हाच साधक बाधक विचार आहे, आपलं प्रेम शरीराच्या बंधनात कधिच नव्हत, आणि म्हणुनच आपण शरीराने लग्न करुन एकत्र आलो किंवा नाही आलो तरी आपलं तरलं प्रेम आपल्याला नक्कीच सोबत राहील. मला ठावुक आहे की माझ्या शिवाय तु आणि तुझ्याशिवाय मी अशी कल्पना सुद्धा करवत नाही, पण आपल्या समोर सध्या तेवढा एकच पर्याय अहे. काही मुर्ख लोक प्रेमात यशस्वी नाही झाले की जीव देण्याचा मार्ग निवडतात, त्यांच्या विचारांची मला कीव येते. अरे जीवन संपविण्यात कसलं आलय प्रेम, हिम्मत असेल तर, एकमेकांच्या प्रेमात आणि आठवणीत आयुष्य जगवुन दाखवा. हे बघ तु सुद्धा यावर विचार कर.. पण मला तरी हाच एक मार्ग दिसतो आहे या परिस्थीतीत.."

तो तिचे विचार ऐकुन स्तब्ध झाला, आपल्याला नेमके काय होत होते ते त्याला कळले. आणि आपल्या दोघांचे विचार इतके कसे जुळतात याचे त्याला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. ... त्याने सर्व मार्गाने प्रयत्न करुन सुद्धा त्याच्या घरुन परवानगी मिळाली नाही म्हणुन मग त्यांनी आपण ठरवलेला मार्ग निवडण्याचे ठरवले.

त्यांची शेवटची, एका अर्थाने शेवटचीच, भेट त्यांच्या जीवनात अविस्मरणिय होणार होती.. त्या दिवशी ते बराच वेळ बसुन होते. दोघेही एकमेकांना डोळ्यात साठवत होते, पण आधीच अश्रुंनी भरुन गेलेल डोळे ते सुद्धा धड करु देत नव्हते.

"का नियती ला हे मंजुर नसावे " तो

"अरे तुच सांगत असतोस ना, बी पॉझीटिव्ह म्हणुन, मग आताही तुझा तो विचार तसाच राहु दे, " ती एवढे म्हणाली खरी, पण आता तीच्याही भावनांचा बांध फुटला, आणि त्याच्या कुशीत येउन तिने अश्रुंना मोकळि वाट करुन दिली. आपल्यावर एवढी प्रेम करणारी व्यक्ती, अशी अचानक दुरावणार हे सत्य दोघांनाही पचवीता येत नव्हते, पण अर्थात तो त्यांनीच निवडलेला मार्ग होता. असा वेगळाच मार्ग निवडतांना त्यांना त्रास झाला होता निश्चितच पण इतरांच्या सुखासाठी स्वतःच सुख नाकारण यातच त्यांच्या प्रेमाची परिपुर्णता होती..

... ती ला थोड्याच दिवसात लग्न करावे लागले, तो ही त्याच मार्गावर आहे. त्याच्या जीवनात मधल्या काळत बरेच सकारात्मक बदल घडले पण दुर्दैवाने ते ऐकण्यासाठी ती नव्हतीच. पुर्वी दिवसातुन किमान एकदा होणार त्यांचा संवाद आता खुंटला आहे, तरीही त्याने आपला मोबाईल नंबर बदलला नाही, हीच अपेक्षा बाळगुन कदाचीत तिला कधी माझी गरज पडली तर मी उप्लब्ध असेन..

आज दोघेही जगताहेत, एकमेकांच सुख जपत इतरांच सुख जपत.. अशाच वेळी गदिमांच्या त्या ओळी खर्‍या होतात

दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ...

Thursday, 21 June 2007

मी देईन कधी हाक


मी देईन कधी हाक


मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

Wednesday, 20 June 2007

नाती


काही नाती मिरवायची असतात; मेडलसारखी
काही दाखवायची असतात; दातांसारखी
काही नाती भोगायची असतात; सम्राटासारखी
काही नाती वाहायची असतात; ओझ्यांसारखी
काही नाती ओळखायची असतात; गुपितांसारखी
काही समजून घ्यायची असतात; प्रेमासारखी
काही नाती जोडायची असतात; धाग्यांसारखी
काही पेलायची असतात; गोवर्धनासारखी
नातीगोती हातात नसतात; नशिबासारखी
म्हणूनच काही नाती विसरायची असतात; दुःखासारखी